Wednesday, 29 January 2014

टोल मधला झोल आणि त्यातल 'राज'कारण

        टोल हा विषय काढल्यावर पहिला प्रश्न येतो टोल घेण खरोखरच जरुरी आहे का? आपण रस्त्याचा जो tax भरतो त्यात भागत नाही का? तो पैसा कुठे जातो हे जाणून घेण पहिल जरुरी आहे त्याचा पुरेपुर वापर होतो की नाही आणि जर होतो अस उत्तर असेल तर तो दिसत का नाही? रस्त्यावर जागोजागी खड्डे दिसतात.मुंबईत रस्त्यात खड्डे आहेत की खड्यात रस्ते हा मोठा प्रश्न. मग अश्या स्थितीत maintainanceच्या नावाखाली टोल का भरायचा? रस्ते नीट करा खुशीने टोल भरु.
          आणि टोलची रक्कम ठराविक का नसते? जर एखादा रस्ता बांधायला 200 करोड खर्च असेल तर वसूली 25 वर्ष1200 करोड वसूल होई पर्यंत चालते. ती 25 वर्ष संपत आली की पुढची 25 वर्ष त्याच्या repairing च्या नावाने उकळतात म्हणजे एक रस्ता बांधला की ह्या भुक्कड contractorच्या चार पिढ्या आरामात एशआरामात जातात ह्यातून publicला फक्त घाणेरडे सिमेंटचा जास्त वापर केलेले रस्ते मिळतात डांबर वाळू कमी वापरुनही हे निच्चड लोक पैसे खातात. मुंबई पुणे express हायवे आपण बघतोच आज कित्येक अपघात टायर तापल्याने होतात ह्याच कारण सिमेंटच आणि ह्याच contractorना सरकार पुन्हा रस्ते बांधायला देत.म्हैसकर group, IRB, Relience infrastructureवाले जसे काय सरकारचे जावई आहेत. साला जनतेची कोणाला पडलीच नाही आहे सरकार आणि contractor ढेकूण आहेत सामान्य जनतेच रक्त शोषल्या शिवाय थांबत नाहीत
             मनात जर ईच्छा असेल तर लोन काढूनही एकदाच पैसे देऊन रस्ते बांधता येऊ शकतात जर 200 करोडचा रस्ता असेल तर साधारण 600 करोड पर्यंत व्याजासकट रक्कम जाईल मग टोलचा हट्ट का? किती म्हणून पैसा खाणार हे राजकारणी? दिवसेंदिवस गाड्यांची संख्याही वाढतेय मग उत्पन्न वाढत नसेल का? आणि टोलसाठी electric pole का नाही वापरत मग? सगळ्याचा व्यवस्थित हिशोब भेटेल आणि पैसे खायला भेटणार नाही म्हणून?
               एक माणूस election आल की सतत स्वतःला अटक करण्याच्या भानगडीत पडतो त्याला लोकांच्या सेवेपेक्षा TRPमध्ये intrest असत.'राज'कारण करणे बस एवढच माहीत. अशी माणस election नंतर गप्प होतात त्यांना तोपर्यंत हफ्ता पण भेटतो आपल आहे तेच चालू राहत. मागच्या निवडणूकीत भैये भेटले नंतर महानगरपालिकेच्या निवडणूकीत मराठी पाट्या भेटल्या आणि आता टोल..सर जनता काही मुर्ख नाहीत दर वेळेस भावनीक होऊन vote करेल.मांडलेले मुद्दे बरोबर असले तरी ते निवडणुकीनंतर विसरले का जातात? नंतर त्यांच काय होत? की 2 दिवस मुंबई पाडली सगळ झाल? आणि हा टोलचा मुद्दा राजू शेट्टीनी उचलला तेव्हा तुम्ही कुठे होतात? की तुमची tube फक्त election च्या महिनाभर आधी पेटते? शेवटी एवढच सांगावस वाटत की जनता आता मुर्ख राहिली नाही आहे काम करा आम्ही खुशीने वोट करु. नाहीतर राजकारणी vs. जनता संघर्ष पेटायला वेळ लागणार नाही

Saturday, 4 January 2014

31st @ Goa

               ह्यावेळेस first time 31st गोव्याला करायच ठरल. गोव्याला कोलवा बीच जवळ आमच booking होत तीथे आलो. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. खुप सार bike riding केल खुप सारे बीच बघितले चर्च बघितले. खुप मजा केली. निसर्गाचा आनंद लुटायचा आहे तर नक्की गोव्याला जाव
              तिकडे दारु खुप स्वस्त त्यामूळे पिणारे 90% लोक.कबुल आहे काहींना enjoymentसाठी एखाद दिवस थोडीशी लागते. पण अतिरेक झाला की enjoyment आणि संस्कृतीच्या नावाला काळीमा फासणारी काम हे लोक करतात. अशी खुप उदाहरण बघितली एक बाई बियर शॉपमध्ये बसली होती अचानक उठली आणि बांबूवर काय चढली नाचली काय हे बघून तिच्या आजूबाजूच्या पुरषांनी तीचा पुरेपुर फायदा घेतला हे बघून foreignersनेही तोंडात बोट घातली. पुढे 2 couples होते त्यांची 3 मुल होती ते couples ईतक्या घाणेरड्या अवस्थेत रेतीवर झोपले होते की पुढचा बघू शकत नाही आणि ती 8 ते 9 वर्षाची पोर बिचारी 'ए बाबा उठ ए आई उठ' करत होती, कितीतरी बायका तर्राट होऊन ईतक्या विक्षीप्त अवस्थेत बीचवर पडल्या होत्या की बघणार्याने डोळे बंद करावेत, कॉलेजच्या मुलांचा एक group होता त्यांनी तर आपापसात मारामारी सुरु केली डोकी फोडली एकमेकांची. ज्यांना प्यायच आहे त्यांनी संयम बाळगून प्यावी विसरु नये आपण एका संस्कृती असलेल्या देशातून आहोत. ज्या देशांना संस्कृती नाही जे आपली संस्कृती बघायला येतात त्यांनीच आपले हे पराक्रम बघितले तर आपली बाहेर ईज्जत काय राहील? आणि जनाची नाही तर मनाची तरी ठेवा जरा 31st ला रात्री अर्धवट धूंदीत उठायची शुद्ध नाही रेतीत आडवतिडव लोळून काय 31st काय enjoy केल असेल ह्या लोकांनी? काहींना वाटत बायका दारु प्यायला लागल्या आपण नाचलो म्हणजे खुप high class झालो पण अस काही नाही मनाने high class व्हा ते जास्त चांगल असेल