Saturday, 3 November 2018

मी आस्तिक की नास्तिक?

                       काही दिवसांपूर्वी आम्ही फिरण्यासाठी दुसर्या शहरात गेलो होतो तर तिथल्या प्रसिद्ध मंदीरात जाणं आलच पण तिथे अस लक्षात आलं की पुजारीच पैसे घेऊन VIPलाईन करुन सोडत आहेत. साधी लाईन उगाच १ ते दिड तास अडवून ठेवायचे चालू होते. हे बघून दर्शन न घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. मी जेव्हा हा प्रकार ऐका मित्राला सांगितला तेव्हा त्याने मला विचारलं प्रश्न तु नास्तिक आहेस की काय? ऐवढ्या लांब फिरायला गेला पण त्या मंदीराचं दर्शन घेतलं नाही? तेव्हा खरं सांगायच तर मलाही प्रश्न पडला मी नक्की कोण आस्तिक की नास्तिक? आणि हा फरक कसा ओळखायचा? कारण खरं म्हणायच झालं तर मी गणपतीत गणपती बघायला जातो ते फक्त फोटोग्राफी करायला, प्राचीन मंदीरात जातो ते मंदीराची माहिती घ्यायला आणि कोरीव काम बघायला आणि तसही खुपच गर्दी असेल, धार्मिक ठिकाणी जीथे गैरप्रकार चालतात धक्के देऊन अकार्यक्षम कार्यकर्ते पुढे ढकलतात तिथे मी जाण्याच टाळतो मग मी त्यालाच प्रश्न केला मी आहे तरी कोण?? तो गमतीने बोलला देवळात जाणारा नास्तिक.
                        देवाला आपण शरीराने, मनाने, ज्ञानाने, बुद्धिने बघू शकत नाही अस धर्मग्रंथात लिहीलेल आहे मग आपण त्यांना मानायच का? खरतर आस्तिक आणि नास्तिक ह्या ऐकाच नाण्याच्या दोन बाजू आहे असं मी मानतो ऐक समाज अस  मानतो की देवाचं अस्तित्व आहे तर दुसरा समाज मानतो की देवाचं अस्तित्व नाही. ऐखादा आस्तिक देवळात जातोय देवाची पुजा करतोय पण घरी आईवडीलांचा छळ करतोय तर तो नक्की कोण? जे मंदीरात लोकांना देवाच्या नावाने लुबाडतात, अंधश्रद्धा माजवतात ते आस्तिक कसे? आस्तिक असणं ह्याची व्याख्या काय? देवाची दिवसभर पुजा करणं? देवाचा जप करणं? की मोठंमोठ्या मौल्यवान वस्तू देवाजवळ ठेवणं?
                         मला कळलेल्या किंवा वाचलेल्या धर्मग्रंथानुसार आस्तिक ह्या शब्दाचा अर्थ आहे की जीवनाच्याप्रती सकारात्मक विचार ठेवा, स्वताच्या प्रगतीसाठी दुसर्याचा वाईट विचार करु नये, लोभ ठेवू नये आणि अन्यायापासून दूर राहणं. तर नास्तिक पणाचा अर्थ आहे स्वतामध्ये पाॅझिटिव्ह ऐनर्जी डेव्हलप करा, नास्तिक लोकांमध्ये देवाची भिती नसते तर वाईट गोष्टींपासून वाचण्यासाठी स्वताच्या मनावर स्वता ताबा ठेवा. कुठलेही भगवे किंवा मौलवींचे कपडे घालून कोणीही आस्तिक बनत नाही. आपले विचार, कृती, बोलण्यातला कृतज्ञ पणा जर साफ असेल तर आस्तिक काय आणि नास्तिक काय दोघाचही आयुष्य सुखकारक असतं.
                         मग पुन्हा मनात प्रश्न येतो धार्मिकता का महत्वाची आहे? संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील किंवा शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक ह्यांनी धार्मिकतेचा अभ्यास का केला असेल? का टिळकांनी गीतारहस्य लिहिलं असेल? ह्याच उत्तर म्हणजे त्यातली शिकवण भग्वद् गीतेमधील शिकवण ही फक्त अर्जूनालाच उद्देशून न राहता ती आपल्या मागच्या पिढीला तसच आपल्या पिढीला व पिढ्यानपिढ्या पुढच्या पिढ्यांना शिकवणारी आहे. पावलान् पाऊल आपण कसे वागावे आपले आचरण विचार कसे आहे कसे असावेत हे त्यात सांगितलेलं आहे. सक्षम माणूस बनण्यासाठी जे गुण आवश्यक असतात ते त्यात सांगितलेल आहे. ह्यासाठी धार्मिकता सुद्धा आपल्या जीवनात खुप महत्वाची आहे. हिंदू तसच मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्माची शिकवण अशीच आहे. कोणीही कुठलाही धर्म वाईट आणि आपला धर्म चांगला अशी शिकवण आपल्या धर्मग्रंथातून करत नाही परंतु लोकं धर्माच्या बाजाराबरोबरच दोन धर्मातील तेढ वाढवू लागले आहेत, आपला धर्म कसा वाढवता येईल हे बघू लागली आहेत ते संपूर्ण चूकीच आहे. मुळात काय तर माणूस आपल्या धर्माच्या शिकवणी विसरलाय, त्यामुळे काही जण मी नास्तिक म्हणून बिंधास्त मिरवू लागले आहेत, बाहेरच्या देशांमध्ये ज्या देशांना संस्कृती नाही असे देश भग्वद् गीतेचे धडे शाळा काॅलेजांमध्ये देत आहेत. का तर चांगला माणूस घडावा पण ईथे तर माणूस पाप करुन पाप धुण्यासाठी देवळात जातो पण त्याची चांगला माणूस बनण्याची ईच्छा नसते. त्यासाठी धार्मिक शिक्षणही शाळांमध्ये तेवढच महत्वाच आहे.
                          ॐ ह्या शब्दाच्या उच्चाराने देवाचा जप करतोय अस नाही तर आपली आपली भाषा शुद्ध होते मन एकाग्र होते. खुद्द आईन्स्टाईन बोलला होता मी नास्तिक नाही, विज्ञानशास्त्रातील बहुसंख्य लोकं समजतात की हे विज्ञान युग आहे ईथे देवाला महत्व नाही पण हे ते विसरता कामा नयेत की त्यांना अजून कोंबडी आणि की अंड ह्याचा शोध लागला नाही, दुसरा सुर्य बनवता आला नाही किंवा माणूस बनवून आत्मा टाकता आलेला नाही, ऐवढी सुसुत्रता आली कुठून? दिवसामागून रात्र होते रात्रीनंतर दिवस, पृथ्वी सुर्याभोवती फिरते ह्यात कधीच खंड पडत नाही. प्राण्यांची उत्तम साखळी बनवलेली आहे उंदराला साप खातो सापाला मुंगूस खातो मुंगूसाला पुढचे प्राणी खातात ह्यात कोणी ढवळाढवळ करत नाही म्हणजेच नैसर्गिक रचना किती उत्तम आहे ह्याचा अंदाज आपण लावू शकतो. पण ह्याच सगळ्यात संशोधनाच्या नावाखाली माणूस चंद्र मंगळ पोखरु लागलाय, नैसर्गिक साखळी तोडू लागलाय माणसाची भूक काही भागत नाही, ऐवढ्या सर्व ऐशोआरामाच्या वस्तूचा शोध लागून माणसाच आयुर्मान घटत चाललय.
                          महाभारत, रामायण हे जरी काल्पनिक वाटत असलं किंवा काल्पनिक असलं तरी त्यातून शिकण्यासारखं खुप आहे. हनुमान स्तोत्रात दिलेले सुर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर हे आत्ता नासाने दिलेल्या अंतराईतकेच आहे. रावणाने सीतेला पुष्पक विमानातून उचलून नेलं, म्हणजेच विमानाचा शोध हा आधीपासूनच लागलेला असावा. तसच बॅटरीचा शोध हा अगस्त्य ऋषींनी लावला असेही पुरावे सापडलेले आहेत. तसेच ब्रम्हा विष्णू महेश हेच ईलेक्ट्राॅन, न्यूट्राॅन, प्रोटाॅन आहेत असही म्हटल जातं, हिंदू धर्म कधीही विज्ञानाला सोडून गेलेला नाही किंवा दुसर्या धर्माचा द्वेश कधी केलेला नाही. तसच बाकीच्या धर्मांनीही दुसर्या धर्मांचा द्वेश करा अस सांगितलेलं नाही. वैदिक गणिताला बाहेरच्या देशात अनन्य साधारण महत्व आहे त्यातही आपण साफ दुर्लक्ष करतो. काही गोष्टींचे आकलन हे बाहेरच्या देशांना
झालंय परंतु आपल्याला झालेल दिसत नाही. संस्कृत बोलून जसे उच्चार सुधारतात, मंत्र बोलून पाॅझिटिव्ह ऐनर्जी येते, मन ऐकाग्र होतं, योगा करुन शरीर तंदुरूस्त होतं लवचिकता येते पण आम्ही मात्र जीमला जातो.
                           खरतर धार्मिकता ही फक्त मूर्तीपूजेपुरती मर्यादित न राहता ती अभ्यासाचा विषय बनली पाहीजे. लहान मुलांना त्याच आकलन झालं पाहीजे नुसत्या आईन्स्टाईन, न्यूटनच्या गोष्टी न सांगता आपले आर्यभट्ट, व्यास किती महान होते तसच, तळपदेंनी लावलेला विमानाचा शोध हे ही अभ्यासात आलं पाहीजे. मंदीरात मुलांना परिक्षेच्या वेळेस पाया पडायला नेण्यापेक्षा हनुमान स्तोत्र, पसायदान, भग्वद् गीतेतील पाठ मुलांना शिकवल्यास मुलांच पाठांतरही झकास होईल आणि देवळात नवस बोलायला जायची गरजही लागणार नाही. पाॅझिटिव्ह ऐनर्जी सकारात्मकता ह्याचा अनुभव येईल. आता तुम्हीच विचार करा नास्तिक आणि आस्तिक कोणाला म्हणाल
                       
                                

Tuesday, 9 August 2016

आधुनिकीकरण

               मला नक्की कळत नाही आहे की technologyच्या बाबतीत आपण विकास करतो आहे की काय? महाराजांचा ३५०वर्ष जुना बांधलेला पुल असेल किंवा त्यांचे किल्ले असतील त्याच्या तोडीच आपण आता कुठल बांधकाम बांधल आहे? Even शहाजहाचे किंवा कुठेलेही महाल बघितले तर पाण्याची सिस्टीम, Eco sound system, ventilation सर्व सिस्टीम लाजवाब,भर दुष्काळात दौलताबादला वैगरे जुन्या काळातील सिस्टीम होती त्याला पाणी होत, महाराज्यांच्या समुद्रातल्या किल्यात १२ महीने गोडं पाणी असत..त्यांच ऐवढ डोक चालायच कुठून आणि आपण शिकून आपल का नाही चालत? आपल्याकडे advanced उपकरण आहेत तरी अस का? त्याकाळात आणि आता फरक का झाला? आपण का करुन घेतला? त्याने काय फायदा झाला?
               आपण का स्वताला त्रास करुन घेत आहोत life fast करुन घेत आहोत..त्याने फक्त competition वाढली पैसे कमवण्याच्या आकांक्षा वाढल्या.. त्यात आपण फक्त दगदग वाढवून घेतली आयुष्य कमी केल स्वताच, पैसे कमवण्यात भ्रष्टाचार वाढला बांधकाम निकृष्ट झाली.. आपण खातो ते खतं युक्त झाल quality ही कशात राहीलीच नाही.. आधी कांदा चिरताना डोळ्यातून पाणी यायच आता त्याला वास पण येत नाही.. आता काय तर water purifier,air purifier वैगरे आलेत,लोक gymला वैगरे जातात so called diet वैगरे करतात तरी आधीच्या लोकांपेक्षा आपल life वाढतय की कमी होतय? थोडक्यात काय ते राजासारखे जगले आणि आपण आधुनिक पणाचा बुरखा घालून गाढवा सारखे जगतोय

Sunday, 15 May 2016

Private शाळा vs जिल्हा परिषद शाळा

      पोरग रेंगायला लागल ना लागल तिथपासून पालकांना वेड लागत ते त्याच्या भविष्याच काय बनणार काय करणार वैगरे वैगरे.. सुरवात होते ती त्याच्या play groupपासून ३ वर्षाच्या मुलाला पोराला गाणी काय म्हणायला लावतात.. A,B,C,D काय बोलायला लावतात..उदाहरण द्यायच झाल तर मागे ऐकदा कोकणात जात होतो traffic जाम झाल होत driverने गाडी बंद केली अर्थात ऐसी बंद झाला पुढच पोरग किरकिर करत रडत उठल त्याला शांत करायला माझी आई अजून काही बायका पुढे गेल्या ते पोरग शांत झाल्यावर बायकांची चांगली गट्टी जमली मग रात्री ३ वाजता त्या पोराच्या आईने त्याच्याकडून A,B,C,D twinkle twinkle little star हे सर्व बोलून घेतल..बायकांच कौतुक ऐकून त्याच्या आईला छान वाटत होत पण त्या मुलाची काय गोची होत होती ते बघून मला त्याची द् या येत होती. काही पालक भयानक आहेत पोरांना खेळणी educational कारने खेळायच नाही.२ वर्षापासून जर्मन, फ़्रेंच language शिकवायला लागलेले पालकही मी पाहीलेत. 
        नंतर सुरवात होते ती शाळेत जायची त्याच्या admissionची त्यातही आता brands आलेत अगदी सर्व नेत्यांपासून ते माणिकचंद वैगरे गुटखावाल्यांनी शाळा टाकल्या आहेत ऐकदम हाय फाय.. पहिलीची फी ऐक लाख रुपये shoes reebok Nikeचे वापरायचे ते पण सांगितलेल्या दुकानातून घ्यायचे.. खेळायला वेगळा पळायला वेगळा पोहायला वेगळा craftला वेगळा असे वेगवेगळे कपडे त्याचा वेगळा खर्च..ऐवढ्याशा पोराचा महिन्याचा खर्च दोन लाख रुपये अश्या शाळेत आपल पोरग गेल की आईबापाची कॉलर ताठ होते.. पण अश्या शाळांमध्ये शिष्टाचार नावाची गोष्ट किंवा संस्कृती कुठपर्यंत शिकवलत जाते? अख्खा दिवस ती पोर शाळेत असतात बाहेरच knowledge शून्य साध ट्रेनमध्ये चढता येत नाही.. पोरांना rough tough करायच सोडून नाजूक साजूक बनवतात.. मध्ये ऐका शाळेबद्दल ऐकल की म्हणे ५वी ची ट्रीप Switzerlandला compulsory जात आहे. ह्या पोरांचे आईबाप दिवसरात्र पैश्याच्या मागे असतात पोरांकडे लक्ष राहत नाही आणि बिघडूही शकतात 
            ऐवढ सर्व यासाठीच लिहावस वाटल उगाच आपल्या सारख्या उच्चमध्यमवर्ग किंवा मध्यमवर्गाचा लोकांना कायम ह्याच attraction असत पोरग English फडफड बोलाव सर्व activities मिळाव्यात पण शिक्षण म्हणजे धंदा झालाय पालकांना attract करुन लुटायच.. मुलात talent असेल तर कसही वर येत.. नेते जिल्हा परिषद मुन्सिपाल्टीच्या शाळा सुधरवायला जात नाहीत त्या सुधरवल्या तर ह्यांचे धंदे बंद होतील.. मुलाचा पाया हा शाळा असते शाळा ही देशाला चांगला नागरीक देण्यासाठी महत्वाची असते..आज किती नेत्यांची पोर जिल्हा परिषदेत शिकली आहेत? आपल्याला लाज वाटली पाहीजे आपल्या सरकारी शाळेंची परिस्थिती बघून.. आज ZPशाळा नीट केल्या तर कोण कशाला private शाळात जाईल? कृपया त्याही शाळा सुधरवा गरीबाची असली तरी आपलीच पोर आहेत त्यांना साधी प्रयोगशाळाही माहीत नाही.. आता Make in Indiaच्या नावाखाली डिजीटल स्कूल देखील होवून जावू देत

Tuesday, 29 September 2015

Digital India

        डिजीटल ईंडीया हा विषय सध्या गाजतोय देशात हवा निर्माण होतेय. कधीकधी प्रश्न पडतो डिजीटल भारताची संकल्पना काय..बाहेरच्या मोठ्या कंपन्यांना भारतात आणायच? त्याना भारतात यावच लागेल कारण भारतात marketing तेवढ आहे. सर्वांनी तिरंगे वाले डी.पी लावले म्हणजे झाल का? ऐवढे भारतीय संकुचित विचारांचे आहेत का? ऐखाद्या गोष्टीचा trend झाला की मागचा पुढचा विचार न करता सर्वांनी त्याच अनुकरण करायच.
         मला अस वाटत Digital India म्हणजे  शाळा e-learning बनवा, भारतीय उद्योजक तयार करा, मोठा भारतीय तरुण वर्ग आहे जो foreignला जातो त्यांच्यासाठी धोरण तयार करा..आज निम्यापेक्षा जास्त गावात internet नाही नी हे काय digital India बनवणार..marketing किंवा गुंतवणूक म्हणजे digital India नव्हे.देशात मोठ्या कंपन्या येण जमेची बाजू आहे पण आपल्या देशात innovationला किती demand आहे? Government शाळांची हे परिस्थिती सुधरवू शकत नाहीत काय हे digital India बनवणार.. विद्यार्थ्याने प्रश्न विचारले पाहीजेत पण त्यांच्याकडूनच नको त्या उत्तरांच पाठांतर करुन घेतो..Engineeringचे जुनाट concept अजून पोर शिकत आहेत. कशी पोर techie होणार? कशी grasping power वाढणार? 
          सत्या नदेला, सुंदर पिचाई बाहेरच्या देशात जाऊन मोठ्या कंपनीचे CEO वैगरे झाले त्यात त्यांच प्रचंड मेहनत, काम आहेच पण त्यांचा आपल्या देशासाठी उपयोग काय? असेच सुंदर पिचाई दुसर्या देशात जाणार असतील आणि त्यांच्या कंपन्या आपल्याकडे आल्यावर आपण आपल्या देशाला digital India म्हणवणार असू तर आपण zero आहोत. Infosys, L&Tमध्ये maximum भारतीय काम करतात ह्याचा अभिमान असतो पण आपण गुलाम आहोत परकीय लोकांच्या managementवर नाचणारे. सोमवार ते शुक्रवार कुत्र्यासारख काम करणार (अस माझ्या ऐकण्यात आहे की Indian लोक बाकीच्यांपेक्षा जास्त काम कमी पैशात करतात आणि बुद्धिमत्ता पण ठासून आहे म्हणून त्यांना पसंती आहे), शनिवार रविवार कुठेतरी पबमध्ये जाऊन नाचणार , इंग्लिशमध्ये अगदी हाय फाय बोलणार, ऐखादी गाडी, मुंबईत 2BHK flat, सुंदर बायको मिळाली की दुनिया गेली तेल लावत..मित्रांनो तुमच्याकडे capability आहे skill आहे, hard working करता तर देशासाठी का नाही? का आपल्याला USला जाण मोठेपणाच वाटत? छोड़ दो यार ये country ये देश का कुछ नही हो सकता सब corrupted अस बोलून काहीच होत नाही. सामान्य वर्ग नोकरी छोकरीत अडकलाय त्यांना त्यातून बाहेर काढायला सरकारने कमी व्याजात कर्ज वैगरे योजना उद्योगांसाठी करायला हव्यात.
             चांगले उद्योजक तयार व्हायला हवेत, innovationवर भर दिला गेला पाहीजे. आपण सर्व थुंकलो तरी ईंग्लंड or अमेरीका वाहून जाईल अस आपण म्हणतो मग हेच देश आपल्यापुढे कसे? आपण उड्या मारायला शिकल पाहीजे.. स्टिव्ह जॉब्स, मार्क झुकर्सबर्ग हे तर drop out होते त्यांना Apple आणि Facebook बनवता आल तर आपल्याकडे IITचे topper बसलेत त्यांना का नाही शक्य होणार मला Facebookमध्ये जॉब मिळेल हा विचार न करता मला Facebookसारख काय बनवता येईल हा विचार महत्वाचा वाटतो. 
              So hope so खर्या अर्थाने आपण digital होवू😃
            
             
         

Thursday, 18 June 2015

राजकारण आणि पैसा

             घोटाळा हा शब्द आठवला तरी राजकारणी राजकारणी आठवतात. पैसे खाण्याचा रोग त्यांना जडलाय अस वाटत भस्म्या रोग.
            भगतसिंह, सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांनी देशासाठी प्राण पणाला लावले. त्यांच्यासाठी लोकही प्राण देण्यास तयार असायची. पण आता लोकांवर प्रेम फक्त मतदानाच्या वेळेस दिसून येत हे मेलेल्या माणसाच्या  टाळूवरच लोणी खाण्यासही कमी पडणार नाहीत हे राजकारणी. शेतकर्यांवर तर भारीच प्रेम दिसून येत. सिंचन घोटाळा, चारा घोटाळा, दुष्काळ पडला की तर मजाच मोठ्या मोठ्या रकमेच्या घोषणा करायच्या कुठे जातात ते पैसे कोणालाच समजत नाही. आधीच्या नेत्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी होती आत्ता आहेत त्यांची फक्त खाणी पिणी आणि उच्च राहणी,उच्च विचारसरणी राहुदेत पण विचारसरणी आणि त्यांचा काही संबंधच नाही. कोळसा घोटाळा, 2G घोटाळा, WAKF board land घोटाळा हे काही लाख करोडमधले घोटाळे आहेत तर सिंचन, चारा, कॉमनवेल्थ, भुजबळांचा हे काही हजार करोडमधले घोटाळे. सामान्याला हजार, लाख गोळा करण मुश्किल आणि हे नेते हजारो लाखो करोडोंचे घोटाळे करतात. ऐवढ्या पैशाच करणार काय? वरती जाताना तर नागडेच जाणार. 
             अगदी नगरसेवकापासून ते मोठ्या नेत्यांचा सर्व पैसा बाहेर काढला आणि अभिनेते उद्योगपती ह्यांची व्यवस्थित करवसुली केली तर भारतावरच कर्ज संपेल एवढ निश्चित. निवडून आल की ५ वर्षांनी ह्यांची संपत्ती ३ ते ५ टक्यांनी वाढलेली असते.असे काय उद्योग असतात? सामान्याला तर सांगा तो करोडो नाही पण लाख तरी कमवेल. सरकारी उद्योग contract baseवर करायचे ती सर्व contract आपल्या घश्यात घालून करोडो रुपये कमवायचे,त्यातही भ्रष्टाचार करुन पुन्हा करोडो रुपये कमवायचे. हे ह्यांचे धंदे. 
                 भुजबळांची २५५६ करोडची प्रॉपर्टी?? अहो त्यातले ५००करोड जरी तुमच्याकडे ठेवले असतेत आणि २०००करोड दुष्काळग्रस्त भागात वापरले असते किंवा गरीबांच्या मुलांना शिकवल असत पण हे का नाही आल डोक्यात? अहो शेतकर्यांच्या गरीबांच्या दुवा मिळाल्या असत्या त्या कितीतरी करोडोंपेक्षा अधिक आहेत. इलेक्शनला जो अमाप पैसा ओतता तो ओतायला लागला नसता लोकांनी हक्काने मदत केली असती आमचा नेता म्हणून. 
                 सर्वच नेते असे नाहीत पण काही नेत्यामुळे तेही बदनाम होतात. सुशिक्षित वर्गाला अश्या लोकांमुळे राजकारणात जायला रसच उरला नाही. जीवनात सर्व सुख उपभोगायला हवीत आपण सर्व गांधिजींसारख नाही होवू शकत ते महान होते पण सुखाची व्याख्या ठरवूनच जगायला हव. आपल्याला किती हव आणि किती आहे ह्याचा विचार करायला हवा. गरीब गार लादीवर जरी झोपत असला तरी त्याला झोप येत असेल पण भुजबळांना नाही. So तुम्ही ठरवा तुम्हाला भुजबळ व्हायचय की मनाने श्रीमंत माणूस व्हायचय. पैसा कसाही कितीही कमवता येतो पण कसा कमवलाय ह्याला महत्व आहे. 

Friday, 9 January 2015

मला भेटायला आलेली वेश्यांची मुल..

              मागच्या वर्षाचा शेवट तसा खुप बेकार झाला accidentझाला,२५ दिवस झाले total bed rest आहे पण त्यातही थोडा आनंद देणारी थोडा विचार करायला लावणारी थोडी अभिमान वाटावी अशी गोष्ट होवून गेली.ती share करतो आहे....
             काल अचानक कॉल आला 'दादा में मंदा बोल रही हूँ' माझ्या लक्षातच नाही आल कोण मंदा आणि काय ते.. परत आवाज आला 'वो धंदेवाली जिनके लड़कों को मदत चाहिये था'.. मग लक्षात आल काही दिवसापूर्वी वेश्यांच्या मुलांसाठी मदत करायच ठरवल होत आणि मदत घेण्यासाठी कॉल आला आहे. 'अभी मेरा accident हो गया है so बादमे १० दिन बाद ठीक हो जाऊँगा तब में खुद सब बच्चोंके पढाई का सामान लेके आता हूँ' बोलून फोन ठेवला..२ तासांनी door bell वाजली कोणीतरी बघायला आल असेल अस वाटल तर १० ते १४ वर्षाची ९ मुल होती गरीबाचीच मुल वाटत होती. 'दादा आपको कहाँ लगा है' हा पहिला प्रश्न होता. विचारल्यावर मग समजल त्यातला एक मंदाचा मुलगा होता. सर्वांना आत बोलावल सर्व आत येऊन बसले. सर्वांनी एक फूल हातात दिल आणि शेवटी एक पेरु हातात ठेवला 'हमलोग ने २०रुपया जमा किया और लेके आया'अस ते सांगत होते आणि literally मला रडायला येत होत, ती एका वेश्याची मुल होती तरी त्यांच्यावरील झालेले संस्कार बघून खुपच भारावून गेलो. 
                नंतर मुल match बघत बसली खायला दिल आणि मुल निघून गेली पण माझ्या डोक्यात ते विचार चालूच होते. एक वेश्या जीची मुल शिकू ईच्छितात आई शिकवू ईच्छिते त्यांच्यासाठी आपण काहीतरी केल पाहीजे नुसत पुस्तक आपण देतच आहोत पण आपण free असताना त्यांना शिकवल पाहीजे अजून चांगले संस्कार झाले पाहीजेत अस काहीतरी केल पाहीजे आणि जर आई ईच्छूक असेल तर आपण तीला ह्या दलदलीतून बाहेर काढल पाहीजे..आणि समाज स्विकारेल अशी काम दिली पाहीजेत भलेही ती धुण्या भांड्याची असोत पण तीला सन्मानाने जगता आल पाहीजे.
               ती मुल आली पण खर्या अर्थाने डोळे ऊघडून गेली आपण नुसते आपल्या समस्याना घेऊन बसलो असतो आपल्याला सर्व मिळत म्हणून जाणीव राहत नाही.. आता खरी जाणीव झाली मी मंदा आणि तीच्या friendsना ह्या धंद्यात कसे घुसलात वैगरे विचारुन बाहेर काढण्याचा आणि पुनर्वसन करण्याचा नक्की प्रयत्न करेन.. Hope आधी लवकर ठीक होईन😅😊

Sunday, 6 July 2014

मुंबई आणि मुंबईकर

   मराठी माझी मायबोली लोकांनी परदेशी नेली सार्यांनी दिला तीला मान अवघ्या महाराष्ट्राची शान संस्कृतीचा मेळ भरतो नाही जीथे दुजाभाव बनतो भाषांचा इंद्रधनू अस माझ गिरगाव
           हे गाण आज अचानक play listला लागल आणि blog लिहावासा वाटला..मुंबईकर म्हटल की गिरगाव,परेल,लालबाग,दादर हे भाग लक्षात येतात जीथे खुप सार्या कापड गिरण्या होत्या तीथे आपला सामान्य मध्यम वर्गीय मराठी माणूस स्थायिक झाला, मोठा झाला.
           मनाने साधा, स्वच्छ मनाचा, पण तेवढाच कणखर एक मारली तर दोन ठेवून देणारा मराठी माणूस, तेवढाच संस्कृतीचा अभिमान, गर्व असलेला हा मराठी माणूस खिश्यात दमडी नसू दे पण सण साजरा करणारच..सांगायला अतिशय आनंद होतो मुंबईतले साजरे होणारे उत्सव बघायला लोक परदेशाहून येतात. गणपती, दहीहंडी, गुढीपाडवा हे सण साजरा करण्यात गिरगाव,परेल,लालबाग,दादरकरांचा हातच कोण धरु शकत नाही. एवढ ऐक्य एवढा जोश अस सगळ्याच जबरदस्त combination मुंबईकरात आहे. आज जरी सगळीकडे बोंब आहे मराठी माणूस मुंबईत खुप कमी दिसतोय तरीही आज तेवढ्याच जोमाने गुढीपाडव्याची प्रभात फेरी निघते, तेवढ्याच जोशात बाप्पा येतात.पण सत्य परिस्थिती मुंबईतली लोक ठाणे, डोंबिवलीत जात आहेत अशी असली तरीही तिकडेही हे ऊत्सव जोशात सुरु आहेत. त्यासाठी मुंबईकराला सलाम
            आज गिरगाव,परेल,लालबाग,दादर भागात मोठे मोठे tower ऊभे राहत आहेत किंमत चार करोड, पाच करोड पण एक मात्र नक्की आहे तीथे राहणारा माणूस पैशासाठी जगतोय आणि सामान्य 10X10च्या खोलीत राहणारा माणूस माणूसकी साठी जगतोय ह्याचा खरच आम्हाला अभिमान आहे. रात्री अपरात्री कोणीही आजारी पडू दे कोणावरही प्रसंग येवू दे अख्खी चाळ जागी असते तस कुठल्याच buildingमध्ये नाही दिसणार, आणि मराठी माणसाकडे पैसे नसले तरी प्रामाणिकपणा कधीच सोडणार नाही.
           पुढे बाहेरच्या राज्यातून धनाढ्य लोक मुंबईत आले. मुंबईत त्यांचा व्यापार तेजीत चालू लागला. त्याचे मोठे offices, malls, high class buildings उभ्या राहिल्या पैसा गिरण्या चालवण्यात नाही buildings बांधण्यात आहे हे लक्षात आल आणि मुंबईतल्या गिरण्या बंद पडल्या.बहुतेक मुंबईकर हा कामगार वर्गातला मुंबईतल्या गिरण्या बंद पडल्या खिश्यात पैसा नाही त्यामूळे जागा विकून बहुतेक मुंबईकर गावात गेले, काही ठाणे,डोंबिवली,कल्याण,बदलापूर अश्या ठिकाणी गेले. हळूहळू मुंबईकरांना मुंबई न परवडणारी झाली त्यांच्या चाळींच्या मोठ्या buildings झाल मुंबईकराला maintenance परवडणारा नव्हता so जागा विकून बाहेरगावी गेले. पण जेवढे शिल्लक आहेत ते ही संस्कृती जपत आहेत.
             मुंबईत अनेक परप्रांतीय आले आपले धंदे बसवले मुंबईकराने त्यांनाही सांभाळल त्यांनाही मोठ केल. तेही आदराने बोलतात 'मुंबई में जाओगे तो भूखा नही सोओगे' मुंबई कष्ट करणार्याची आहे. कष्ट केलात तर पैसा आहे. सेकंदावर धावणारा मुंबईकर ट्रेनमध्ये चौथी सीट भेटली तरी खुश होतो. अश्या मुंबईकराला सलाम..:-)